◻️ जनसेवा मंडळाचे अमोल खताळ यानी याबाबत प्रतिक्रीया दिली आहे
◻️ भविष्यातही सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढाई सुरूच राहील
◻️ संपर्ण कुटूंबाला मतदान केंद्रावर थांबून राहावे लागणे म्हणजे स्वंताच्या कार्यकर्त्यावर विश्वास राहीला नाही
◻️ सामान्य उमेदवारांना मतदानातून पाठबळ दिल्याबद्ल मतदारांचे मानले आभार
संगमनेर LIVE | कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाच्या उमेदवारांनी केलेली राजकीय लढाई धाक दडपशाहीच्या विरोधात होती. झालेल्या पराभवाने खचून न जाता भविष्यातही सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढाई सुरूच राहील आशी प्रतिक्रीया जनसेवा मंडळाच्या वतीने अमोल खताळ यांनी दिली.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अमोल खताळ यांनी म्हणाले आहे की, बाजार समित्याच्या निवडणुकीत सताधारी गटाचा विजय कसा झाला हे जनतेन पाहील आहे. कोणतीही संस्था कर्मचारी आणि पैसा नसलेले सामान्य कुटूबांतील उमेदवार विचारांची लढाई करण्यासाठी निवडणुकीत उतरले होते. या उमेदवारांना पडलेली मत लक्षात घेता प्रस्थापितांना तालुक्यात विरोध आहे हे सिध्द झाले आहे.
स्वंताला राज्याचे नेते म्हणवून घेणारे नेते बाजार समितीच्या निवडणुकीसाठी चार तास बुथवर येवून बसले यातच त्यांचा आत्मविश्वास किती ढासळला हे सुध्दा जनतेला काल पाहायला मिळाले. संपर्ण कुटूबाला मतदान केंद्रावर थांबून राहावे लागणे म्हणजे स्वताच्या कार्यकर्त्यांवर विश्वास राहीला नसल्याचा थेट आरोप अमोल खताळ यांनी केला.
जनसेवा मंडळाची लढाई कोणा व्यक्ती विरोधात नाही तर प्रवृती विरोधात आहे. गेली अनेक वर्षे ठेकेदारांच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम सुरू आहे. परंतू आता ठेकेदारी प्रवृतीला चाप बसविण्याचे काम महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू झाल्याने तालुक्यातील जनता आता जाहीरपणे बोलू लागली आहे. कोणताही धाक दडपशाही न जुमानता सूज्ञ मतदार प्रवृतीच्या मतदान करू शकते हे बाजार समितीच्या निवडणुकीत उघड झाले. सामान्य उमेदवारांना मतदानातून पाठबळ दिल्याबद्ल खताळ मतदारांचे आभार मानले आहेत.
या पराभवाने उमेदवार आणि कार्यकर्ते खचलेले नाहीत, आमच्यातील आत्मविश्वासही ढळलेला नाही. उलट मिळालेल्या मतदानामुळे भविष्यातील संघर्षाला पाठबळ मिळाले असून. आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यामुळे का होईना राज्यस्तरीय नेत्यांना बांधावर मतदारांच्या घरी जावे लागले जे यापुर्वी कधीही घडले नव्हते. विरोधी उमेदवारांनी पडलेली मत सुध्दा प्रस्थापित नेत्यांना धक्का देणारी ठरली असल्याकडे अमोल खताळ यांनी लक्ष वेधले.