शेतकऱ्यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन करावे - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
शेतकऱ्यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन करावे - बाळासाहेब थोरात

◻️ सहकारमहर्षी थोरात कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

◻️ १ जानेवारीपासून १० टक्के पगारवाढीची घोषणा

◻️ बुद्धीभेद करुन विष कालवणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच रोखण्याचे केले आवाहन 


संगमनेर LIVE | मागील हंगामात ३ हजार २०० रुपये उच्चांकी भाव दिला. बोनस आणि पगार वेळेत यामुळे बाजारपेठ फुलली आणि दिवाळी आनंदात गेली. थोरात कारखान्यावर सभासद व बाहेरील ऊस उत्पादकांचाही मोठा विश्वास असून आपला हेतू चांगला असल्याने चांगले काम होत आहे. प्रत्येक शेतकऱ्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी शंभर टन उत्पादन केले पाहिजे. असे आवाहन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. सौ कांचनताई थोरात, व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, रणजीतसिंह देशमुख, जयश्रीताई थोरात यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, कारखान्याची रात्रंदिवस चाके फिरत असतात. परमेश्वराची कायम साथ आपल्याला असते. आपला हेतू चांगले असल्याने चांगले काम होते. मागील हंगामात ३,२०० रुपये भाव दिला. कामगार, सभासद, ऊस उत्पादक, व्यापारी यांना दिवाळी चांगली गेली. जे चांगली आहे ते नेहमी आपण करतो .काहींना हे सहन झाले नाही.

यावर्षी ९ लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त गाळप होणे अपेक्षित असून यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने व निळवंडेचे पाणी आल्याने ऊस लागवड चांगली आहे. पुढच्या वर्षी १५ लाख मेट्रिक टना पर्यत गाळप होईल. जास्त गाळप झाले तर बगॅस जास्त निघतो. को जनरेशन चांगले होते. युनिट एक्सपर्ट होते.

सर्व शेतकऱ्यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन होईल यासाठी काम करावे. याचबरोबर कार्यक्षेत्रातील आणि कार्यक्षेत्रातील बाहेरून सुद्धा वेळेवर येईल यासाठी प्रोग्रॅम प्रमाणे काम करावे. परिपक्व ऊस आणावा. कारण गाळप करताना रिकवरी महत्त्वाची असते. सर्व ऊस लागवड सहाव्या महिन्यात झाल्याने अनेकदा अडचण होते. परंतु परिपक्व ऊस आणला गेला. तर चांगले रिझल्ट येतील. असे सांगताना कारखान्याने कायम वेळेत पगार बोनस याचबरोबर शेतकऱ्यांचे वेळेत पेमेंट अदा केले आहे. बाहेरील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. त्यांचेही वेळेत पेमेंट केले आहे. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. कालव्यांच्या वरच्या भागात पाणी देण्यासाठी आपण नियोजन केले होते आणि आपला तो शब्द होता. वरच्या भागातील नागरिकांनाही पाणी मिळाले पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि ते शक्य असल्याचे सांगत १ जानेवारीपासून १० टक्के पगारवाढ सुद्धा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा दिशादर्शक असून या सहकारामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असते. याचबरोबर मोठी रोजगार निर्मिती झाली आहे. चांगल्या ऊस उत्पादनाबरोबर शेतकऱ्यांनी शेतीसाठी कंपोस्ट खताचे वापर करावे असे आवाहन त्यांनी केले

डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, जुन्या पिढीने सायकल पासून ते आत्तापर्यत सर्व अनुभवले आहे. नवीन पिढीला सर्व रेडिमेड मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जपण्यासाठी आपल्याला सर्वाचा विचार घेऊन पुढे जायचे आहे असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर, व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी आभार मानले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्यासाठी एजन्सीचा वापर..

आपले काम चांगले आहे. सहकार चांगला आहे. अनेकांची जीवन फुलले आहे. मात्र काही लोकांना ते सहन होत नाही. काम न करता राजकारणाचा सोपा उपाय म्हणजे एजन्सी लावून खोट्या रील बनवायच्या. व्हाट्सअप वर खोटी माहिती टाकायची. खोटा प्रचार करायचा असे उद्योग लोक करत आहेत. जे भाव देत नाही. ते हे उद्योग करत आहेत. बुद्धीभेद करत आहेत. धर्माचा वापर करत करून तरुणांमध्ये विष कालवत आहे अशा प्रवृत्तींना वेळीच रोखा. बाळासाहेब थोरात यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !