निळवंडे धरणातून थेट पाणी पुरवठा करण्‍यास शासनाने मंजुरी द्यावी

संगमनेर Live
0
निळवंडे धरणातून थेट पाणी पुरवठा करण्‍यास शासनाने मंजुरी द्यावी

◻️ १७ गावांच्‍या ग्रामपंचायतींनी ठराव करत पालकमंत्री विखे पाटील यांच्‍याकडे केली मागणी

◻️ दुष्‍काळी भागावातील गावांना दिलासा द्या - शरद गोर्डे 

संगमनेर LlVE | तळेगाव व परिसरातील २१ गावांचा पाणी प्रश्‍न कायमस्‍वरुपी सोडविण्‍यासाठी या योजनेला निळवंडे धरणातून थेट पाणी पुरवठा करण्‍यास शासनाने मंजुरी द्यावी अशी मागणी १७ गावांच्‍या ग्रामपंचायतींनी ठराव करुन, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍याकडे केली आहे.

या संदर्भात मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांची १७ गावांतील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्‍थांनी भेट घेवून या मागणीचे निवेदन सादर केले आहे. या गावांना भेडसावत असलेली पाणी टंचाई, पाणी पुरवठा योजनेकडे थकीत असलेले विज‍ बिल आणि ग्रामपंचायतींनी यापुर्वी या मागणीसाठी केलेल्‍या पाठपुराव्‍याचे कागदपत्र, पालकमंत्र्यांना पुन्‍हा नव्‍याने केलेले ठरावासह सुपूर्त केले. वर्षानुवर्षे पाण्‍यापासून वंचित राहीलेल्‍या गावांना कायमस्‍वरुपी पाणी मिळावे या उद्देशाने सर्व गावांनी एकत्रित येवून केलेल्‍या मागणीला पुन्‍हा एकदा महत्‍व प्राप्‍त झाले आहे.

तळेगाव आणि पंचक्रोशितील २१ गावे गेली अनेक वर्षे पाण्‍यापासून वंचित होती. या गावांकरीता प्रवरा नदी हा पाण्‍याचा उद्भव मानून या तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्‍यात आली. या योजनेमुळे गावांना दिलासा मिळाला असला तरी, योजनेपुढे थकित विजबिला अभावी निर्माण होत असलेल्‍या समस्‍यांमुळे ही योजना यशस्‍वीपणे चालू शकत नसल्‍याची बाब या शिष्‍टमंडळाने ना. विखे पाटील यांच्‍या निदर्शनास आणून दिली आहे.

सद्य परि‍स्थितीत या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेपुढे विज बिल थकबाकीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला असून, ९ कोटी ७२ लाख रुपयांचे विज बिल सध्या योजनेकडे थकीत असल्‍याने विजप्रवाह खंडीत करण्‍याच्‍या नोटीसा सातत्‍याने देण्‍यात येतात. त्‍यातच या योजनेकरीता पाण्‍याचा उद्भव प्रवरा नदी पात्रातून असला तरी, निंबाळे आणि वडगावपान या दोन ठिकाणांहून पाणी पंपिंग करुन उचलून न्‍यावे लागत असल्‍याने यासाठी लागणारा विज खर्च योजनेवर पडत आहे. पाण्‍याचा उद्भव ते प्रत्‍यक्ष तलाव यातील अंतरही मोठे असल्‍याने बहुतेक वेळा पाईपलाईनमध्‍ये होणाऱ्या बिघाड दुरुस्‍तीचा खर्चही योजनेवर पडत आहे.

यासर्व पार्श्‍वभूमीवर या सर्व गावांनी निळवंडे धरणातून संगमनेर शहरापर्यंत आलेल्‍या पाईपलाईनचा संदर्भ देवून हीच पाईपलाईन पुढे तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्‍या वडगावपान येथील तलावास जोडल्‍यास नैसर्गिक प्रवाहाने या योजनेत पाण्‍याची उपलब्‍धता होवू शकते. शहरा पासून पाईपलाईन टाकण्‍याचा खर्चही खुप कमी येईल. तसेच निळवंडे धरणातील पाण्‍यावर तळेगाव आणि पंचक्रोशितील गावांचाच हक्‍क आणि आधिकार असल्‍याने अनेक वर्षांची असलेली मागणी शासनाने पुर्ण करावी व पाईप लाईन टाकण्‍यास येणा-या खर्चास निधीची उपलब्‍धता करुन देण्‍यात यावी अशी मागणी निवेदनाव्‍दारे करण्‍यात आली आहे.

यापुर्वी या मागणीसाठी ग्रामस्‍थांनी वेळोवेळी आंदोलनं केली आहेत. पिण्‍याच्‍या पाण्‍याची गंभिर समस्‍या लक्षात घेवून महायुती सरकारने खास बाब म्‍हणून या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस थेट निळवंडे धरणातून पाईपलाईन व्‍दारे पाण्‍याची उपलब्‍धता करुन दिल्‍यास दुष्‍काळी भागावातील गावांना दिलासा मिळेल. असे निळवंडे भोजापूर पाटपाणी कृती समितीचे शरद गोरडे यांनी म्हटले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !