घरासमोरील रस्त्यावर पाणी टाकल्यामुळे दोन गटात तुबंळ हाणामारी.

संगमनेर Live
0
आश्वी खुर्द येथिल घटना ; दोन जखमी ; परस्पर विरोधी गुन्हे दाखल.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे मंगळवारी सकाळी ९ वा. घरासमोरच्या सार्वजनिक रस्त्यावर मुलानी पाणी का फेकले.? या वादातून दोन गटात तुफान शिविगाळ व हाणामारीत दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात दोन ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रांरी दाखल करण्यात आल्या असून आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दत्तात्रय मच्छींद्र बर्डे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, मंगळवार दि. १८ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर मुलानी पाणी का फेकले हे विचारले असता विजय बाळाजी पवार, शिवप्रसाद रमेश पवार, कृष्णा रमेश पवार, रमेश बाळाजी पवार यांनी मला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली असून गुरंव नंबर ६९/२०२१ नुसार भादंवी कलम ३२३, ३२४, ५०४, ३४ प्रमाणे चौघाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसऱ्या तक्रांरीत विजय बाळाजी पवार यांनी म्हटले आहे की, मी रस्त्याने जात असताना दत्तात्रय मच्छिद्र बर्डे, सदाशिव मच्छिद्र बर्डे, छाया सदाशिव बर्डे, संगिता दत्तात्रय बर्डे हे रस्त्याचा कडेला उभे राहून शिवीगाळ करत होते. त्यांना  शिवीगाळ करु नका असे म्हटल्याचा राग आल्याने त्यानी मला लाथा बुक्यांनी तर दत्तात्रय बर्डे याने डोक्याला दगडाने मारहाण केल्याचे म्हटले असून गुरंव नंबर ७१/२०२१ नुसार भादंवी कलम ३२३, ३२४, ५०४, ३४ प्रमाणे चौघाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी तक्रारीवरुन आश्वी पोलीस ठाण्यात आठ जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक फौजदार एस. एस पवार व हवालदार आर. बी. भाग्यवान हे करत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !