◻️ केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा नागरिकांशी संवाद
संगमनेर LIVE | लोकसभा प्रवास योजने अंतर्गत शिर्डी लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी संगमनेर मध्ये चाय पे चर्चा कार्यक्रमातून पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरीकांशी संवाद साधला. येथील बसस्थानकावर त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहीती दिली.
संपूर्ण देशात जलजीवन मिशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महाराष्ट्रात या योजनेचे शंभर टक्के उद्दीष्ट पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मागच्या अडीच वर्षात आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे जलजीवन योजनेचे काम मागे पडले. मात्र आता योजनेतील गती पाहाता प्रत्येक घरात पाणी देण्याचे मोदीजीचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या देशातील प्रत्येक नागरीकाला घर शौचालय मोफत अन्नधान्य वैद्यकीय उपचार आशा योजनांची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू आहे. किसान सन्मान योजने बरोबरच नव्या शिक्षण नितीमुळे उद्योग आणि व्यापारी क्षेत्रात बदलांचे परीणाम पाहायला मिळत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
याप्रसंगी आ. डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, योगीराज परदेशी, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, डॉ. अशोक इथापे, राम जाजू, अमोल खताळ, डॉ. सोमनाथ कानवडे, वैभव लांडगे, राजेंद्र सांगळे, किशोर नावंदर, पोपटराव वाणी, हरीशचंद्र चकोर, शैलेश फटांगरे, राहूल भोईर,
सुधाकर गुंजाळ, भरत फटांगरे, अरुण इथापे, रोहिदास गुंजाळ, संदीप जगनर, डॉ. महेंद्र कोल्हे, राजेंद्र सांगळे, दिलीप इंगळे, गणपत शिंदे, संदीप देशमुख, पोपट कोल्हे, रवींद्र देशमुख, शिवाजी कोल्हे, शांताराम शिंदे, सिताराम मोहरीकर, प्रविण शेपाळ, सौ. कविता पाटील, संदीप घुगे, यशवंत शेळके, संतोष शेळके, संजय मोरे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.