विज्ञान तंत्रज्ञांनाच्या युगात सेंद्रिय शेती टिकविणे काळाची गरज - सौ. शालिनीताई विखे पाटील
◻️ आश्वी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन
संगमनेर LIVE | मानवाने आज सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले आहे. विज्ञान व तंत्रज्ञांनाच्या आविष्काराने मानवी जीवन जितके सुकर झाले तितकेच त्याचे परिणामही आपल्याला पाहायला मिळत आहे. पारंपरिक जीवन पद्धतीचा वापर हळूहळू कमी होत आहे. आधुनिकतेच्या नावाखाली आपली आदर्शावत असलेली संस्कृती आपण जपणे गरजेचे आहे. शेती व संस्कृती टिकविण्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञांनाच्या युगात सेंद्रिय शेती टिकविणे काळाची गरज आहे. तीच उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र उध्दघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ. विखे बोलत होत्या. यावेळी डॉ. व्ही. एन. मगरे, डॉ. अनिल बोरकर, अण्णासाहेब भोसले, निवृत्ती सांगळे, डॉ. राम पवार, डॉ. अनिल वाबळे, डॉ. महेश खर्डे, प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे, डॉ. सोमनाथ भूमकर, डॉ. राजेंद्र गायकर, डॉ. सारिका रोहमारे, प्रा. दत्तात्रय लोखंडे, प्रा. मोईन पटेल, प्रा. गणेश शेळके आदी उपस्थित होते.
सौ. विखे पाटील पुढे म्हणाल्या की, विचार करण्याच्या पद्धतीवर आपले भवितव्य अवलंबून आहे. आपण विचार करत असताना सर्वाचा विचार करून मार्गक्रमण करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये विचार करण्याची क्षमता खूप असते त्यांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश खर्डे यांनी केले. प्रा. दत्तात्रय लोखंडे व डॉ. सारिका रोहमारे यांनी कार्यक्रमाची मांडणी केली. सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता खळदकर व वर्षा गायकर यांनी केले आणि आभार डॉ. सोमनाथ भूमकर यांनी मानले.