स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा!
◻️ आमदार अमोल खताळ यांचे धांदरफळ येथील बैठकीत महायुतीच्या कार्यकर्त्याना आवाहन
संगमनेर LIVE | विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वानी आपसातील मतभेद बाजूला ठेवून ज्या प्रमाणे मला विजयी केले. त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वानी आपसातील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागावे. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील सांगवी येथील रस्ते कामाचा व धांदरफळ खुर्द येथील नागेश्वर मंदिर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते झाला. त्यानंतर मिलिंद खताळ यांच्या निवासस्थाना जवळील प्रगणात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणु कीच्या पार्श्वभूमीवर धांदरफळ गटाची बैठक झाली.
याप्रसंगी बोलताना आमदार खताळ यांनी विधानसभेच्या निवडणुकी मध्ये जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने या तालुक्यात गेली ४० वर्षाची प्रस्थापितांची सत्ता उलथावून टाकत परिवर्तन केले. तसेच परिवर्तन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुद्धा करायचे आहे. त्यासाठी सर्वानी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून आतापासूनच कामाला लागावे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गटाच्या रचना बदलल्या असल्या तरी कार्यकर्ते तेच आहेत, विधानसभेची निवडणूक नेत्यांची होती.
मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कार्यकर्त्याच्या आहेत. जशा सर्वानी विधानसभेसाठी तन-मन-धनाने काम केले तसेच काम पंचायत समिती आणि ग्रामपंचायत च्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून विकास करायचा आहे. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या त्रिमूर्तीबरोबरच संगमनेर तालुक्याचे पालकत्व घेऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी या तालुक्यातील कार्यकर्त्याना जिवंत ठेवले.
संगमनेर तालुक्यातील भोजापूर धरण, चारीचे काम यांसारख्या मोठ्या प्रकल्पांना महायुती सरकारने गती दिली केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणली आहे.
विरोधकांनी खोट्या गुन्ह्यांत लोकांना अडकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. राजकारण खालच्या पातळीवर गेले असून, विरोधकांना जनाची नाही तरी मनाची वाटली पाहिजे अशी टीका करून, आगामी निवडणुकी मध्ये उमेदवार कोण असेल हे पालकमंत्री विखे पाटील आणि इतर नेत्यांसोबत चर्चा करून ठरवले जाईल असे सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांनी तयारी करावी, ग्राम पंचायतींमध्ये असलेल्या अडचणींवर डिसेंबरमध्ये लक्ष घालणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांनी संगमनेर तालुक्याचे नाव मोठे केले आणि आ. अमोल खताळ यांच्या माध्यमातून ते राज्यात नव्हे, तर देशात नेण्यात यशस्वी झाले. एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाल्याबद्दल अभिमान अर्जुन महाराज खताळ यांनी व्यक्त केला.