पुढील वर्षीच्या पावसाळ्यातील निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणणार - ना. थोरात

संगमनेर Live
0

थोरात कारखान्याची उच्चांकी गाळपासह हंगामाची सांगता.

संगमनेर Live | ऊस व दुध हे शाश्‍वत उत्पादनाचे साधन आहे. आगामी काळात सर्व शेतकर्‍यांनी एकरी उत्पादन वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी काम होत आहे. थोरात कारखान्याने या हंगामात विक्रमी ऊस गाळपाची कामगिरी केली आहे. कोरोना संकट असूनही २०२२ च्या पावसाळ्याातील निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणणेसाठी प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री नामदार थोरात यांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे हे होते. व्यासपीठावर जेष्ठ नेते बाजीराव खेमनर, कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ, सौ. दुर्गाताई तांबे, जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन अ‍ॅड. माधवराव कानवडे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजित थोरात, गणपतराव सांगळे, अमित पंडित, व्हा. चेअरमन संतोष हासे, शंकर खेमनर, शिवाजीराव थोरात, सौ. सुनंदाताई जोर्वेकर, नवनाथ अरगडे, रामदास वाघ, आर. एम. कातोरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.  

ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन करतांना ना. थोरात म्हणाले कि, सहकारी संस्थांमुळे ग्रामीण विकासात मजबुती आहे. ऊस व दुध हे शाश्‍वत आहे. कारखान्याने यावर्षी १९२ दिवसांत विक्रमी १३ लाख १९ हजार मे. टनाचे गाळप केले आहे. कारखान्यावर सभासद, तालुक्यातील व कार्यक्षेत्राबाहेरील शेतकर्‍यांचा मोठा विश्‍वास आहे. वेळेत व योग्य भाव हे वैशिष्ट आपण कायम जपले आहे. नवीन कारखाना निर्मितीचा निर्णय हा अत्यंत लाभदायी ठरला आहे. कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सह आधुनिक प्रणालीचा वापर करावा लागेल. कारण कार्यक्षेत्रातील ऊस वाढी नंतर बाहेरील वाहतूकीचा खर्च कमी होवून जास्त भाव देता येवू शकतो.

कारखान्याने सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोरोना संकटात ५०० बेडचे कोविड सेंटर सुरु केले तर ऑक्सिजन प्लॅन्ट लवकर सुरु होणार आहे. सर्व सहकारी संस्था या गुणवत्तेने चालविण्यात सामान्य माणसाचे जीवनमानात आनंद निर्माण करणे हाच आपला ध्यास आहे. शेतकरी व कार्यकर्त्यांनी आपल्या प्रपंचाशी निगडीत सहकारी संस्था जपल्या पाहिजे. राजहंस दुध संघाने लॉकडाऊनच्या काळात एक दिवस ही बंद ठेवला नाही. शाश्‍वत भाव दिला. मात्र दुध उत्पादन कमी झाले कि काही उत्पादक एक रुपयासाठी इतरत्र दुध घालतात हे योग्य नाही. कोरोनाचे मोठे संकट आहे. सरकार अत्यंत पारदर्शकपणे काम करत आहे. अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यात सर्वाधीक टेस्ट झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे विलगीकरण करुन त्यांवर उपचार केले जात आहे. सर्वाधिक टेस्टिंगमुळे रुग्णवाढ दिसत आहे. तसेच आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचे निळवंडे कालव्यांच्या कामासाठी मोठा निधी मिळविला आहे. मागील दीड वर्षात दोन लॉकडाऊनमुळे मजुर स्थलांतरित झाले आहे. या कामात अडथळे येत आहे. तरी ही २०२२ च्या पावसाळ्यातील पाणी शेतकर्‍यांना देण्याचा आपला प्रयत्न आहे.

आ. डॉ. तांबे म्हणाले कि, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरच्या सहकाराचा पाया घातला. त्यांच्या आदर्शवत तत्वांवर व नामदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली या संस्थांचा आज देशात लौकिक आहे. बारीक बारीक गोष्टींमध्ये काटकसर, नवीन तंत्रांचा वापर केला जात आहे. अत्यंत कार्पोरेट पध्दतीने हा सहकारी साखर कारखाना चालविला जात आहे. शेतकर्‍यांच्या जीवनात समृध्दी आणण्यासाठी नामदार थोरात सातत्याने प्रयत्न करत आहे. निळवंडे धरण त्यांच्याच हातून झाले आहे. कालव्यांना मोठा निधी मिळून विना प्रसिध्दी ते पाणी लवकरात लवकर आणण्यासाठी ते काम करत आहे असे ही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी तर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

खा. राजीव सातव यांना श्रध्दांजली..

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व नामदार बाळासाहेब थोरात व संगमनेर परिवाराशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले युवा खा. राजीव सातव यांना अमृत उद्योग समूह व साखर कारखान्याच्या वतीने सामूहिक श्रध्दांजली यावेळी अर्पण करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !