स्व. विलासराव देशमुख हे राज्यातील कार्यकर्त्याचे प्रेरणास्त्रोत - आ. डॉ. तांबे

संगमनेर Live
0
संगमनेरकरांनी जागवल्या विलासराव देशमुख यांच्या आठवणी.

संगमनेर Live | आपल्या अष्टपैलू नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देताना स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी सतत कार्यकर्ते जोडले. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्यावर बंधू प्रमाणे प्रेम करणारे हसतमुख व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले स्व. विलासराव देशमुख हे राज्यातील कार्यकर्त्यांचे सदैव प्रेरणास्रोत ठरले असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे

यशोधन संपर्क कार्यालयात स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, नितीन अभंग, रमेश गुंजाळ, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. डॉ. तांबे म्हणाले की, विविध प्रश्‍नांची जाण असणारे स्वर्गीय विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. विकास कामांची दूरदृष्टी, तत्परता, हसतमुख स्वभाव यामुळे रायातील जनतेच्या मनावर त्यांनी अधिराज्य केले. विलासराव देशमुख यांनी सातत्याने महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्यावर व संगमनेर तालुक्यावर खूप प्रेम केले. त्यांनी नामदार थोरात यांना लातूर उस्मानाबाद येथे १२ वर्षे पालकमंत्रीपद दिले. संगमनेर तालुका हा काँग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलेला आहे. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात व जिल्ह्यात पक्षाचे मोठे काम होत असून महसूल मंत्री नामदार थोरात राज्यात अत्यंत महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळत आहेत. 

संगमनेर तालुक्यातील अनेक ऐतिहासिक योजना पूर्ण करताना विलासराव देशमुख यांनी मोठे सहकार्य केले आहे. संगमनेर शहरातील निळवंडे थेट पाईपलाईन योजना ही देशमुख साहेबांच्या काळात मंजूर झालेली आहे. त्यांच्या आठवणी व केलेले कार्य हे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देणारे असल्याचे ते म्हणाले

सुभाष सगळे म्हणाले की, स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. काँग्रेस पक्षाची भक्कम फळी त्यांनी उभे केली. अनेक तरुणांना मोठ्या संधी दिल्या. आज राज्यात महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असून दिल्लीत ही महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यात व उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस अधिक सक्षम करत तरुणांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करावे असेही ते म्हणाले.

दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बाबा खरात यांनी केले तर सुरेश झावरे यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !