उंबरी बाळापूर येथे विवाहितेची विहिरीत आत्महत्या.

संगमनेर Live
0

तिघे पोलीसाच्या ताब्यात ; तणावपूर्ण वातावरणात अत्यसंस्कार.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे मयुरी पवन सारबंदे (वय - २४) या विवाहित महिलेने सासरच्या जाचांला वैतागून विहिरीत उडी मारत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून उंबरी बाळापूर सह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

याबाबत अशोक वर्पे यानी आश्वी पोलीस ठाणे येथे दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, माझी मुलगी मयुरी हिचा विवाह २०१७ मध्ये पवन सारबंदे याच्यांबरोबर झाला होता. पती पवन सारबंदे, भाया अरुण सारबंदे व जाव वैशाली उर्फ बाली सारबंदे हे जमीन व गायी खरेदीसाठी मुलीने माहेराहून ५० ते ६० हजार रुपये आणावेत यासाठी नेहमी शिविगाळ करत होते. त्यामुळे पैसे आल्यानतंर देऊ असे आम्ही तिच्या सासरच्या मडळीना सांगितले होते.

२०२० च्या सुरवातीपासून किरकोळ कारणावरुन शिविगाळ तसेच मारहाण करुन पैसे आणण्यासाठी बळजबरी केली जात होती. त्यामुळे ५, १० हजार असे १ लाख रुपये सासरच्या मंडळीला दिले आहेत. परंतू मुलीला त्रास व पैशाची मागणी सुरुचं होती. ९ ऑगस्ट रोजी मयुरीने विहिरीत उडी मारल्यामुळे लोणी येथे उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती नवरा पवन याने दिली. त्यामुळे मी रुग्णालयात गेल्यानतंर मुलगी मयत झाल्याची माहिती मिळाल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा रंजिस्टर नबंर १५४/२०२१ नुसार भादंवी कलम ३०४(ब), ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे तीन जणावर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

गुरुवारी रात्री उशीरा शोकाकूल व तणावपूर्ण वातावरणात मयत मयुरी हिच्यावर उंबरी बाळापूर येथील स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी मोठा पोलीसाचा फौजफाटा उपस्थित होता. दरम्यान पोलीसानी तिन्ही आरोपीना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याना रविवार पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !