१९७२ च्या जुनी अकरावीत असलेल्या विद्यार्थ्याचा स्‍नेहमेळावा संपन्न.

संगमनेर Live
0
४८ वर्षानी आश्‍वी इग्लिश स्‍कुलचे विद्यार्थी आले एकत्र.

संगमनेर Live | मित्रत्‍वाचे ऋणानुबंध गुरुजणांप्रती असलेली कृतज्ञता यात सामाजिकतेचे भान जपत जुन्‍या अकरावीतील वर्गमित्री तब्‍बल ४८ वर्षांनी एकत्र आले. एका आगळ्यावेगळ्या झालेल्‍या कार्यक्रमात त्‍यांनी गप्‍पाटप्‍पा मारीत जुन्‍या आठवनींना उजाळा दिला. संगमनेर तालुक्‍यातील आश्‍वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्‍थेच्‍या आश्‍वी इग्लिश स्‍कुल आश्‍वी विद्यालयातील १९७२ मध्‍ये जुनी अकरावीत असलेल्‍या विद्यार्थी विद्यार्थीनीचा स्‍नेहमेळावा नुकताच उत्‍साहात पार पडला.

सन १९७२-७३ सालात एसएसस्सी (जुनी आकरावी) चे माजी विद्यार्थी स्‍नेहमेळावा नुकताच संगमनेर येथील स्‍वागत लॉन्‍समध्‍ये संपन्‍न झाला. त्‍यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून विद्यालयाचे माजी शिक्षक प्रा. पी. के जाधव यांनी माजी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले.

तरुण वयात शिक्षण घेत असलेले हे माजी विद्यार्थी विद्यार्थीनी वेगवेगळ‍्या क्षेत्रात आपल्‍या कार्यकतृत्‍वाचा ठसा उमटवित आहेत. तब्‍बल ४८ वर्षानंतर हे माजी विद्यार्थी स्‍नेहमेळाव्‍याच्‍या निमित्‍ताने एकत्रित आल्‍याने त्‍यांच्‍या आनंदाला पारावार उरला नाही. माणूस किती मोठा झाला तरी तो आपल्‍या शाळेला विसरत नाही. जिथे अभ्‍यासाचे धडे गिरवून जिवनात यशस्‍वी झालो, ती पवित्र शाळा, तेथील शिक्षक आणि जिवाभावाची मित्र मंडळी यांची पुन्‍हा भेट घडविण्‍याचा हा सोहळा माजी विद्यार्थ्‍यानी केला.

त्‍यावेळचे शाळेचे दिवस आठवून प्रत्‍येकजन आनंदाने एकमेकांशी भेटून आपली नव्‍याने ओळख करुन देत, जुन्‍या आठवनींना उजाळा देतानाच सध्‍या आपल्‍या आयुष्‍यात काय चालले आहे हे एकमेकांना सागताना गप्‍पांची मैफील रंगली. हे सर्व माजी विद्यार्थी आजही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहेत ४८ वर्षानी विद्यार्थी व शिक्षक एकत्रित आल्‍याने सर्वांच्‍या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दाटून आला होता.

यावेळी माजी विद्यार्थी व डॉ. विखे पाटील कारखान्‍याचे माजी संचालक प्रतापराव तांबे पाटील, माधवराव बाळाजी गायकवाड, प्रा. सखाराम अघाव, सुरेश तांबे, दिलीप तापडीया, शंकूतला चिंतामणी (बोऱ्हाडे), मिरा विखे, अलका मुनोत, लता गांधी, सौ. कुंदा गायकवाड, वामन वाकचौरे, आर. डी. कदम, किसन नागरे, अशोक चांडक, नानासाहेब म्‍हसे, सखाराम पारधी, दुरगुडे, सोनवणे, भोसले, रामेश्‍वर आसावा, धोंडीराम घोलप, रावसाहेब मुखेकर या माजी विद्यार्थ्‍यांच्‍या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्‍न झाला.

दरम्यान यावेळी प्रतापराव तांबे, प्रा. सखाराम अघाव, सौ. शकूंतला चिंतामणी तसेच हॉटेल स्‍वागतचे संचालक दिलीप तापडीया यांनी सर्वाची स्‍नेहभोजनाची उत्‍कृष्‍ठ व्‍यवस्‍था केली. भोजनाचा आस्‍वाद घेत त्‍यांनी असेच यापुढेही आपण सातत्‍याने भेटू अशी ग्‍वाही देत कार्यक्रमाला पुर्णविराम दिला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !