शिर्डी येथे ‘हर घर तिरंगा' अभियान प्रचारासाठी ‘तिरंगा रॅली'चे आयोजन

संगमनेर Live
0
साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते रॅलीस हिरवा झेंडा

◻ हजार ते पंधराशे विद्यार्थी रॅलीत झाले सहभागी

संगमनेर Live (शिर्डी) | शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे श्री. साईबाबा महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवार, २५ जुलै २०२२ रोजी 'हर घर तिरंगा' अभियानाच्या प्रचारासाठी 'तिरंगा रॅली' काढण्यात आली. श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (IAS) यांच्या हस्ते या रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली.

अहमदनगरचे केंद्रीय संचार ब्यूरो आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'निमित्त (आझादी का अमृत महोत्सव) या 'तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी अहमदनगर केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, माहिती अधिकारी सुरेश पाटील, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी. कुमार, श्री. साईबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिवगजे, श्री. साईबाबा कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. व्ही. वरघुडे आदी उपस्थित होते.

या तिरंगा रॅलीस कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचारी वर्ग, विद्याथी - विद्यार्थीनींचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद लाभला. साधारणत: हजार ते पंधराशे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात भारताचा कापडी राष्ट्रध्वज होता. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीत ‘भारत माता की जय', 'वंदे मातरम्', 'इन्कलाब जिंदाबाद', 'सारे जहां से अच्छा हिन्दोस्तां हमारा' व 'विजय विश्व तिरंगा प्यारा' या सारख्या राष्ट्रप्रेमाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या भारत माता, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडीत नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या वेशभूषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.  विद्यार्थ्यानी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा '७५' या अंकाचा देखावा साकार केला.

तिरंगा रॅलीत शुभेच्छा देतांना श्रीमती बानायत म्हणाल्या, देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत राहावे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, देशाप्रती जाज्वल्य भावना जागृत राहणार आहेत.

जायभाये म्हणाले, श्री. साईबाबा संस्थानच्या देवालयाच्या १६ गुंठे प्रांगणात २६ ते २८ जुलै २०२२ रोजी, सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना - घडामोडींचे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १८५७ ते १९४७ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा चित्र आणि माहिती स्वरुपात मांडण्यात आली आहे. सर्वासाठी विनामुल्य खूले राहणाऱ्या या प्रदर्शनाचा आबालवृध्दांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !