◻️ आश्वी पोलीस स्टेशन व संगमनेर तहसीलदार यांना दिले निवेदन
◻️ शांततेच्या मार्गाने बुधवारी महिला, पुरुष व तरुणाची शिस्तबद्ध रँली
संगमनेर Live (योगेश रातडीया) | झारखंड राज्यातील वीस जैन तिर्थकरांचे महानिर्वाण क्षेत्र असलेल्या पवित्र तीर्थ सम्मेद शिखरजीची पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केल्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील जैन समाज रस्त्यावर उतरत शांततेच्या मार्गाने बुधवारी आश्वी बंद ठेऊन मोर्चाद्वारे आश्वी पोलीस स्टेशन व संगमनेर तहसीलदार यांना निवेदन देत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.
जैन समाजाचे पवित्र तीर्थ सम्मेद शिखरजी पर्वत उर्फ पारसनाथ पर्वत झारखंड राज्यातील गिरडी जिल्ह्यातील छोटा नागपुर या ठिकाणी जैन धर्माचे २४ तिर्थंकर पैकी २० तिर्थंकर हे या ठिकाणी तप करून मोक्ष गतीला गेले होते. यामुळे हि पावन भुमी जैंन धर्मीयासाठी पवित्र व पावन तीर्थ आहे. या ठिकाणाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्याने जैन धर्मीया चा भावना दुखवल्या गेल्या असून या ठिकाणी पर्यटन क्षेत्र घोषित केल्याचा निषेधार्थ आश्वी बंद ठेऊन शांततेच्या मार्गाने आश्वी पोलीस स्टेशन पर्यत मोर्चा काढून पोलीस निरीक्षक सुभाष भोये व कामगार तलाठी यांना निवेदन देऊन आपल्या भावना शासनापर्यंत पोहचविण्यात आल्या.
या बंदमध्ये सर्व जाती धर्माचा लोकांनी सहभाग नोंदविला. यावेळी मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर, विनायक बालोटे, उपसरपंच राहुल जऱ्हाड, माजी सरपंच हरिभाऊ ताजणे, बाळकृष्ण होडगर, संतोष रासने, पंकज नाके, पंकज कोळपकर, योगेश कुलथे, हारुणभाई शेख, अरीफ शेख, फिरोज शेख, गणेश खेमनर, अनिल म्हसे, किशोर जऱ्हाड, डाॅ. अनिल बालोटे, चांगदेव खेमनर, नंदकिशोर लाहोटी, केदार बिहाणी, कैलास बिहाणी,
सुमतीलाल गांधी, अश्विनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विनीत गांधी, योगेश रातडीया, अनिकेत पटवा, संजय गांधी, प्रशांत गांधी, सुशिल भंडारी, श्रेणीक बोरा, अभीजीत गांधी, रोहीत भंडारी, निलेश चोपडा, अमित भंडारी, प्रितम गांधी, किरण गांधी, वैभव भंडारी, अश्विन मुथ्था, नितीन गांधी, अभिजीत बिहाणी, पप्पलेश लाहोटी, समीर गांधी, सुमतीलाल रातडीया, योगेश लुंकड, सागर रातडीया, जयंत्तीलाल भंडारी, गौतम रातडीया, अविनाश गांधी, संदिप बोरा, भगवान बोरा, विशाल गांधी, मनोज पटवा, किशोर पटवा सह महिला तसेच आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.