◻️ माहिती देणाऱ्या नागरीकाना वनविभागाच्या कर्मचाऱ्याकडून आरेरावी
◻️ मृत बछड्याला पाहण्यासाठी नागरीकाची मोठी गर्दी
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर - साकूर रस्त्यालगत बुधवारी सकाळी झालेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली असून याबाबतची माहिती देणाऱ्या ग्रामस्थाना वनविभागाच्या कर्मचाऱ्याने आरेरावी केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने या कर्मचाऱ्याच्या वागणूकीबाबत नागरीकानी संताप व्यक्तं केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी शिबलापूर - साकूर रस्त्यावरील शिबलापूर शिवारातील जिजाबा नागरे यांच्या शेतजमीनीलगत एक बिबट्याचे पिल्लू झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे नागरीकानी थोडे जवळ जाऊन पाहिले असता पिल्लाच्या तोडातून रक्त येऊन पिल्लू मृत झाल्याचे त्याच्यां लक्षात आले.
त्यामुळे उपस्थित नागरीकानी पत्रकार संजय गायकवाड याना फोन करुन याबाबतची माहिती देऊन वनविभागाचा नबंर घेतला. नबंर मिळाल्यानतंर त्यानी वनविभागाला घटनेची माहिती दिली होती. तर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे अथवा तरसाच्या हल्ल्यात या पिल्लाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
माहिती मिळाल्यानतंर वनविभागाचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी माहिती देणाऱ्याच नागरीकाना या मुजोर कर्मचाऱ्यानी आरेरावी करत या मृत बिबट्याच्या पिल्लाचा फोटो काढण्यास मज्जाव केल्याने नागरीकानी या मुजोर कर्मचाऱ्याच्यां वागणूकीबाबत संताप व्यक्तं केला आहे.
दरम्यान या मृत बिबट्याच्या बछड्याला वनविभागाचे कर्मचारी आपल्या समवेत घेऊन गेले असून बिबट्याचे पिल्लू मृत पावल्याची घटना घडल्याची माहिती मिळाल्यामुळे घटनास्थळी नागरीकानी मोठी गर्दी केली होती.
शिबलापूर, पानोडी, आश्वी, उंबरी बाळापूर, पिप्रीं आदिसह प्रवरा नदी तिरावरील गावानमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यासह तरसाची मोठी दहशत आहे. वनविभागकडून नागरीकाच्या हिताच्या कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे वनविभाग किवां कर्मचाऱ्याचे संपर्क क्रमांक नागरीकाकडे उपलब्ध नाहीत.
त्यामुळे नागरीक नेहमी संपर्कात असलेल्या स्थानिक पदाधिकारी अथवा पत्रकाराना घटनेची माहिती देत असतात. याचाचं राग मनात बाळगून वनविभागाचे कर्मचारी हे माहिती देणाऱ्यासह उपस्थित नागरीकाना आरेरावी करण्याच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वनविभागाबाबत नागरीकानमध्ये संतापाची भावना निर्माण होऊ लागल्याने वरीष्ठ अधिकाऱ्यानी या कर्मचाऱ्याना योग्य ती शिस्त लावणे गरजेचे असल्याची भावना नागरीकानी व्यक्त केली आहे.