◻️ भाजीपाला, फळ व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, टपरी धारक, धान्य व्यावसायिक, शेतकरी यांना नाहक त्रास
◻️ अन्यथा.. ठिय्या आंदोलन व उपोषणाचा शहरप्रमुख अमर कतारी यांच्यासह पदाधिकाऱ्याचा इशारा
संगमनेर LIVE | संगमनेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चुकीच्या व अन्यायकारक पद्धतीने हटवण्यात येणाऱ्या अतिक्रमण बाबत नुकतेच मुख्याधिकारी संगमनेर नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, लघु व्यावसायिक, भाजीपाला, फळ व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, स्टॉल, टपरी धारक, धान्य व्यावसायिक, शेतकरी यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहीम बाबत अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्याची मागणी करुन व्यवसायिकांसाठी योग्य मार्ग काढण्याची विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनाद्वारे प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की, गेल्या काही दिवसापासून आपण संगमनेर नगरपालिका हद्दीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे. सदर अतिक्रमण हटाव मोहीम ही संगमनेर करांच्या किंवा नगरपालिकेसाठी महत्त्वाची असली तरी सदर अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे सर्व सामान्य माणूस देशोधडीला लागलेला आहे सदर अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
सदर अतिक्रमण हटाव मोहिमेत आपण फक्त एकतर्फी विचार करून कोणत्यातरी एका वादाच्या घटनेचा सुड समस्त टपरीधारक, छोटे व्यावसायिक, भाजीविक्रेते, शेतकरी, फळ विक्रेते, किरकोळ दुकानदार, स्टॉल, हातगाडी वाले यांच्यावर काढत आहात असे म्हणून अतिक्रमण हटाव मोहीम शिथिल करावी. शेतकरी वर्ग, भाजीपाला व्यावसायिक, फळाचे दुकानदार व इतर व्यवसायिकांचे व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
यातील काही लोक पन्नास वर्षापेक्षा जास्त काळापासून सदर ठिकाणी व्यवसाय करत आहे. अगोदरच दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प झालेले आहेत. अनेक लोक कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, व्यवसाय मध्ये तोटा झालेला आहे आणि अशातच आपण ज्या पद्धतीने ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहात यात आपण सर्वसामान्य व्यावसायिक यांचा भाजीपाला व्यवसायिक व इतर सर्व व्यवसायिकांचा विचार देखील केलेला नाही.
संगमनेर मध्ये काही लोकांची भांडणे झाली याचा परिणाम संगमनेर शहरातील बाजारपेठेवर देखील झालेला आहे. या भांडणाचा सर्वात जास्त फटका या अतिक्रमणधारकांना झालेला आहे. ज्या ठिकाणी वाद भांडणे झालेत ज्या ठिकाणी अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. त्या ठिकाणचे अतिक्रमण आपण काढलेल् आहे. त्याबाबत आमचे कोणतेही म्हणणे नाही, आपणास अतिक्रमण हटवण्यास आम्ही विरोध करत नाही. परंतु सदर व्यवसायिकांची काहीतरी व्यवस्था आपण लावून द्यावी व सदर प्रश्न कायमचा मार्गी लावावा असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख अमर कतारी यांनी मांडले.
यावेळी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी देखील विनंतीपूर्वक सूचना केली. दीपक साळुंखे यांनी नवीन नगर रोड येथील टपरी धारकांबाबत सूचना मांडली व नेहरू चौक येथील व्यापारी भाजीपाला व्यवसायिक व धान्य दुकानदार याबाबत सूचना विनंती सुदर्शन ईटप यांनी केली. तसेच आपण सदर अतिक्रमण धारक भाजीपाला विक्रेते सर्व व्यावसायिक लोकांना आहेत त्या ठिकाणी विशिष्ट सीमा आखून द्यावी, आपल्या नियमाच्या सीमेच्या बाहेर येऊन जर कोणी अतिरिक्त अतिक्रमण करत असेल तर आपण निश्चितच कारवाई करावी.
परंतु कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या व्यवसायिकांना आपण अधिक त्रास न देता काहीतरी पर्याय काढावा ही विनंती जर आपण चार दिवसात योग्य तो निर्णय घेतला नाही तर आम्ही समस्त संगमनेर तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अधिकृत संघटना व टपरीधारक, गाळेधारक, फळभाजी विक्रेते, छोटे-मोठे स्टॉल, धान्य व्यावसायिक अतिक्रमणधारक सर्व आपल्या संगमनेर नगरपालिकेत ठिय्या आंदोलन व उपोषण आंदोलन करू. या आंदोलनादरम्यान होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. त्यामुळे आमच्या मागणीचा शांततेने विचार करुन कोणताही एकतर्फी निर्णय न घेता गोरगरीब जनतेचे व्यावसायिक बांधवांचे हाल थांबवावे ही विनंती करण्यात आली.
दरम्यान शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, अपंग सेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, बाजार समिती सदस्य विजय सातपुते, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, वेणुगोपाल लाहोटी, दीपक वन्नम, दीपक साळुंके, मुस्लिम मावळा अजीज मोमीन, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे, उपतालुका प्रमुख वैशालीताई वडतल्ले, महिला आघाडी शहरप्रमुख संगीताताई गायकवाड, युवासेनेचे अक्षय बिल्लाडे, अमोल डुकरे, योगेश खेमनर, फैजल सय्यद, अक्षय गाडे, माधव फुलमळ, सदाशिव हासे, संकी पंजाबी, शेतकरी बांधव, टपरीधारक, अतिक्रमण धारक, भाजीपाला, फळ व्यावसायिक व किरकोळ विक्रेते यावेळी उपस्थित होते.