पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक कैलास तांबे ऊस दर नियंत्रण मंडळाच्या सदस्यपदी

संगमनेर Live
0
◻️ प्रथमचं अहमदनगर जिल्ह्यातील व्यक्तीला समितीत काम करण्याची संधी

◻️ कैलास तांबे यांचा ग्रामपंचायत सदस्य ते ऊस दर नियंत्रण समिती पर्यतचा प्रवास 

संगमनेर LIVE | शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळावा यासाठी राज्य सरकारने नवीन ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना केली असून या समितीत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक व संगमनेर तालुक्यातील चिचंपूर येथिल उच्चविद्याविभूषित व प्रगतशील शेतकरी कैलास सुर्यभान तांबे यांचा साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात आला आहे. बहुदा प्रथमचं जिल्ह्यातील व्यक्तीला या समितीत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळणार असल्याने जिल्ह्यासह संगमनेर तालुका व चिचंपूर पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे.

चिचंपूर येथिल कैलास तांबे हे राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे विश्वासू सहकारी आहेत. राजकारणासह समाजकारणात त्याचे मोठे काम असून वेगवेगळ्या पदांवर काम करण्याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. तसेच पंचक्रोशीत प्रगतशील शेतकरी म्हणून देखिल ते प्रसिद्ध असून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे ते विद्यमान संचालक आहेत. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे ते धार्मिक वृत्तीचे असल्याने सरला बेटांचे महंत रामगिरी महाराज, हभंप रामराव महाराज ढोक व उध्दव महाराज मंडलिक यांचे आशीर्वाद सदैव त्याच्यां पाठीशी असल्याचे कैलास तांबे सांगतात. तर कै. सुर्यभान पाटील तांबे यांच्याकडून समाजकारण व राजकारणाचे बाळकडू मिळाल्यामुळेचं हे यश संपदित करू शकलो असे म्हणतात.

कैलास तांबे यांनी भुषविलेली पदे...

२००५ साली ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरवात केल्यानंतर कैलास तांबे यांनी मागे वळून पाहिले नाही. चिचंपूर गावचे सरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक, संंगमनेर पंचायत समिती सदस्य, अहमदनगर जिल्हा आत्मा समिती सदस्य, पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक व व्हा. चेअरमन, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक, दुधेश्वर उपसा जलसिंचन योजना चिचंपूर चेअरमन व आता राज्य शासनाकडून नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या राज्यपातळीवरील ऊस दर नियंत्रण समितीत साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे.

यामुळे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र विखे पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव कडू पाटील, मांचीहिल शिक्षण संकुलाचे संस्थापक शाळीग्राम होडगर, आश्वी परिसराचे जेष्ठ नेते भगवानराव इलग, माजी जिल्हा परिषद सदस्या रोहीनीताई किशोर निघते, कांचनताई मांढरे, कारखान्याचे संचालक रामभाऊ भुसाळ, डॉ. दिनकर गायकवाड, शांताराम जोरी, प्रवरा बॅकचे माजी चेअरमन अशोकराव म्हसे, शिवाजीराव इलग, अनिल भोसले, दाढ खुर्दचे सरपंच सतिष जोशी, चिचंपूर येथिल गिताराम तांबे, लक्ष्मणराव तांबे, शत्रुघ्न तांबे, शंकरराव तांबे, गिताराम पवार, गंजाबा तांबे आदिसह ग्रामस्थ व आजी माजी पदाधिकारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छां दिल्या आहेत.

ना. राधाकृष्ण विखे पाटील यानी राज्यपातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. एफआरपीनुसार कारखाने शेतकऱ्यांना दर देतात की नाही हे पाहण्याबरोबरचं राज्यातील कारखानदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम प्राधान्याने करु. अशा भावना कैलास तांबे यांनी व्यक्त केल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !