संसदेत घुसखोरी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - रामदास आठवले

संगमनेर Live
0
संसदेत घुसखोरी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - रामदास आठवले

◻️संसदेत काही जणांनी घुसखोरी करत केला गॅस हल्ला 

संगमनेर LIVE (मुंबई) | संसदेवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मृत्यू पावलेल्या शहीदांच्या स्मृतिदिनी आज संसदेत काही जणांनी घुसखोरी करुन आपल्या बुटातुन लपुन आणलेल्या गॅस फोडुन गॅस हल्ला केला. संसदेत घुसखोरी करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली.  

ना. आठवले. पुढे म्हणाले की, संसद भवन हे लोकशाहीचे मंदीर आहे. देशाचे प्रमुख स्थान आहे. या संसदेची सुरक्षा ही कडेकोट असली पाहिजे. संसदेच्या सुरक्षेत आज ही मोठी चुक झाली आहे. संसदेची सुरक्षा ही  अधिक मजबूत कडेकोट केली पाहिजे अशी सूचना ना. रामदास आठवले यांनी केली. 

संसदेत घुसुन आंदोलन करणे, गोंधळ घालणे, गॅस हल्ला करणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. संसदेची सुरक्षा ही अबाधीत राहिली पाहिजे. संसदेची सुरक्षा भेदून असा प्रकार करणे हा देशद्रोह आहे. असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !