सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी घेतली जखमी वारकऱ्यांची भेट

संगमनेर Live
0
सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी घेतली जखमी वारकऱ्यांची भेट

◻️ जखमी रुग्णाच्या उपचारांची माहीती डॉक्टरांकडून घेतली जाणून

◻️ उपचारानंतर काही रुग्णाना सोडले घरी

संगमनेर LIVE | आळंदी कडे निघालेल्या शिर्डी येथील दिंडीला झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी भेट घेवून दिवासा दिला.

जखमी रुग्णांचे सर्व वैद्यकीय चाचण्यांचे रीपोर्ट प्राप्त झाल्यानंतर काही रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर अन्य रूग्णांवर उपचार सुरू असून आज सौ. विखे पाटील यांनी जखमीच्या उपचारांची माहीती डॉक्टरांकडून जाणून घेतली.

या सर्व रुग्णांवर कोणताही अर्थिक भार येवू देवू नका, उपचारांचा सर्व खर्च मंत्री विखे पाटील यांनी करण्याची जबाबदारी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले

आळंदी यात्रेकरीता शिर्डी येथून निघालेल्या दिडींला संगमनेर तालुक्यात अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्याना संगमनेर येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या जखमी रूग्णांना सौ. विखे पाटील यांनी भेट देवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून दिलासा दिला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !