नाशिक - पुणे महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाला वेग!
◻️ माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याला यश
संगमनेर LIVE | काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. नाशिक - पुणे महामार्गावरील इंजिनिअरिंग कॉलेज गेट समोरील उड्डाणपूल कामासाठी बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून ३८ कोटी रुपये मंजूर झाले होते. तेचं काम अत्यंत वेगाने सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संगमनेर शहरातील वाहनांची वर्दळ कमी व्हावी याकरता माजी मंत्री थोरात यांनी तत्कालीन दळणवळण मंत्री सी. पी. जोशी यांच्याकडे पाठपुरावा करून ९ किलोमीटर लांबीचा बिना टोल बायपास मंजूर करून घेतला व हा बायपास २०१४ मध्येच नागरिकांसाठी खुला केला. यामुळे शहरातील वाहतूक बाह्य मार्गाने वळवली गेली. याचबरोबर घुलेवाडी सुकेवाडी हा बायपास केल्याने अनेक वाहतूक त्या मार्गाने ही वळवली गेली.
याचबरोबर संगमनेर शहरासाठी इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हॅपी हायवे रस्ता सुशोभीकरणासह पूर्ण झाल्यामुळे संगमनेर शहराच्या वैभवात भर पडली होती.
घुलेवाडी येथील माझे घर सोसायटी लगत असलेल्या हॉटेल स्टेटस समोर (नाशिक जंक्शन) पुणे - नाशिक महामार्गावरून संगमनेरकडे येताना व या महामार्गावर जाताना रस्त्याच्या गुंतागुंतीमुळे हा भाग अपघात प्रवण क्षेत्र झाला होता. या ठिकाणी अनेक अपघात झाल्याने बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय दळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपल्या वैयक्तिक संबंधातून विशेष पाठपुरावा करून या उड्डाणपुलाच्या कामाकरता ३८ कोटी रुपयांचा निधी मिळवला.
मात्र एका बाजूचा पूल काही कारणास्तव प्रलंबित राहिला होता. सप्टेंबर २०२४ मध्ये बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा या कामाकरता पुढाकार घेऊन हे काम सुरू केले. यामध्ये स्थानिकांना सोबत घेऊन त्यांचेही अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे दिवाळीपूर्वीच या कामाला गती मिळाली होती.
आता या नाशिक जंक्शनवर दुसऱ्या बाजूने उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने बायपास सुद्धा तयार करण्यात आले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण होणार असून यामुळे माझे घर सोसायटी सह घुलेवाडी ग्रामस्थ, आदर्श नगर, वेल्हाळे, सायखिंडी, चिकणी, मालदाड या स्थानिक नागरिकांसह नाशिककडे जाणाऱ्या व नाशिक वरून संगमनेरकडे येणाऱ्या नागरिकांची दळणवळणासाठी मोठी सोय होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.