पर्यावरणाचे संवर्धन हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
पर्यावरणाचे संवर्धन हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य - बाळासाहेब थोरात

◻️ सहकार महर्षी थोरात कारखान्याच्या परिसरात २०१ आंबा वृक्षांचे रोपण

◻️ संगमनेर तालुक्यात पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा

संगमनेर LIVE | हवामान आणि ऋतूंमधील बदल याचबरोबर वाढती उष्णता आणि ग्लोबल वार्मिंगची समस्या टाळण्याकरता वृक्षारोपण व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे असून ते प्रत्येकाने मूलभूत कर्तव्य म्हणून बजावले पाहिजे. असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दंडकारण्य अभियानांतर्गत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये २०१ आंबा वृक्षांचे तसेच तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षांचे रोपण करण्यात आले. 

यावेळी बाळासाहेब थोरात, व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, रणजितसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रा. बाबा खरात, संपतराव गोडगे, तुषार दिघे, विनोद हासे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजने, दिलीप नागरे, सौ. लता बाबासाहेब गायकर, सौ. सुंदराबाई रावसाहेब दुबे, आनंद वर्पे, बाळासाहेब सावंत, बाळासाहेब फापाळे, किरण कानवडे, शिवाजी खुळे, रामनाथ शिंदे आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्याकरता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी २००६ मध्ये दंडकारण्य अभियान सुरू केले. या अंतर्गत तालुक्यातील उघड्या बोडक्या डोंगरांवर वृक्षारोपण करण्यात आले. तालुक्यामध्ये वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. पर्यावरण जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य बनले आहेत.

कोरोना संकटामध्ये ऑक्सिजनची कमतरता आणि अनन्य साधारण महत्व संपूर्ण जगाने अनुभवले. वृक्ष हे आपल्याला २४ तास मोफत ऑक्सिजन देत असतात. त्यांचे संवर्धन हे केलेच पाहिजे. याचबरोबर प्लॅस्टिकचा वापर कमी करणे हेही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, संगमनेर तालुक्याप्रमाणे कृषीप्रधान भारत देशामध्ये पर्यावरण संवर्धन ही लोक चळवळ उभी राहिली पाहिजे. दंडकारण्य अभियान ही संगमनेर तालुक्याची ओळख बनली आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये प्रत्येकाने या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेऊन कमीत कमी दोन वृक्ष रोपण व त्याचे संगोपन करावे असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बाबा खरात यांनी केले. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले.

रिमझिम पावसात पर्यावरण गीते..

५ जून निमित्त कारखाना परिसरामध्ये वृक्षारोपण करताना रिमझिम पाऊस सुरू झाला. यावेळी प्रा. खरात यांनी विविध पर्यावरण संवर्धनाची गीते गायली. ‘झाडे लावा.. झाडे जगवा’, ‘पाणी आडवा.. देश वाचवा’ या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !