◻ सॅम पित्रोदा, फ्रँक इस्लाम, कन्हैया कुमार, पत्रकार संजय आवटे यांसह आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तंज्ञाचा सहभाग.
संगमनेर Live | सदृढ लोकशाही व निरोगी समाज निर्मितीसाठी कार्यरत असणार्या जयहिंद लोकचळवळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२० या काळात जागतिक शांतता, सुसंवाद व प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय विश्लेषक सॅम पित्रोदा, अमेरीकेचे नेते फ्रँक इस्लाम यांसह आंतरराष्ट्रीय तज्ञांचा सहभाग असलेली ऑनलाइन ग्लोबल कॉन्फरंन्स आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.
या ग्लोबल कॉन्फरन्स बाबत माहिती देताना आ. डॉ. तांबे म्हणाले की, मागील २० वर्षांपासून जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून युवकांना रचनात्मक कार्याची दिशा देत सदृढ लोकशाहीसाठी व निरोगी समाजनिर्मीतीसाठी काम होत आहे. जगातील सध्याची अस्थिरता व भीतीचे वातावरण यावर मात करत जागतिक शांतता, सामाजिक सलोखा व मानवतेच्या वृद्धीसाठी जयहिंद लोकचळवळ च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञांचा समावेश असलेली ग्लोबल कॉन्फरन्स ऑनलाईन आयोजन केले आहे. यामध्ये शुक्रवार दि. २ ऑक्टोबर रोजी पहिल्या सत्रात सायं ७ ते ८ या वेळेत महात्मा गांधी, शांतता, सुसंवाद आणि प्रगती या विषयावर भारतीय संगणक व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक स्व. राजीव गांधी यांचे सल्लागार व टेलीकॉम विझार्डचे संचालक आणि संशोधक सॅम पित्रोदा, इंडो अमेरीकन नागरी नेते व आयटी उद्योजक फ्रँक इस्लाम, जर्मनीचे राजकीय नेते क्लॉडिया क्रॉफर्ड, महराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, अमेरीकेतील न्यु जर्सी येथील एडिसनचे महापौर थॉमस लँकी, भारतातील जेष्ठ विचारवंत डॉ. संदीप वासलेकर, अमेरीकेचे मायकल क्रॉली यांच्या उपस्थितीत या सत्रात परिसंवाद होणार आहे.
तर रात्री ८.३० ते ९.३० या वेळेतील दुसर्या सत्रात २१ व्या शतकात महात्मा गांधींच्या विचारांचे महत्व याविषयांवर जेष्ठ पत्रकार खा. कुमार केतकर, जेष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, तुर्कीचे इंग्रजी तज्ञ उगर इरूलकर, ज्ञानेश्वर यवतकर, गार्गी गाडे मार्गदर्शन करणार आहे.
शनिवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी तिसर्या सत्रात सायं ७ ते ८ या वेळेत सदृढ समाज निरोगी समाज यवस्था या विषयावर जयहिंदचे संस्थापक आ. डॉ. सुधीर तांबे, औषध तंज्ञ डॉ. रविंद्र गोडसे, इंग्लडमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ. संग्राम पाटील, ओमान देशामधील सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ.नितू चाबरिया, सबरिना चौधरी, अरिफ रेहमान, डॉ. टायलर व्हर्नन हे मार्गदर्शन करणार आहे.
तर रात्री ८.३० ते ९.३० या वेळेतील चौथ्या सत्रात सामूहिक शेती व शाश्वत उत्पन्न या विषयावर बारामती अँग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, कृषी विभागाचे सहाय्यक मुख्य सचिव डॉ. सुधीर गोयल, सौ. आदिती अमित देशमुख (लातूर), प्रशासकीय अधिकारी विमलेंद्र शरण, अन्न संधोधनातील डॉ. मुकुंद कर्वे, व्हीट्रीट चेलवन (पाँडेचरी) हे मार्गदर्शन करणार आहे.
रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी पाचव्या सत्रात सायं ७ ते ८ या वेळेत महिलांचे आर्थिल सक्षमीकरण व सामाजिक सुरक्षितता या विषयावर संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री कल्पना सरोज, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या फायनांन्स ऑफीसर पुजा कराचीवाला, सेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, डॉ. क्लारिसा (ऑस्ट्रेलिया), पल्लवी शिंदे (अमेरीका), डॉ. युझोमी यम्मामोटो (जपान), डॉ. हेमा अब्दुल हलीम (जॉर्डन), अॅड. स्मिता सिंगलकर (नागपूर), प्रियंका वामन (अभिनेत्री) तर रात्री ८ ते ९ या वेळेतील सहाव्या सत्रात लोकशाही या विषयावर कन्हैया कुमार, डॉ. कार्लस टर्नर (लंडन), जेष्ठ पत्रकार संजय आवटे, मायकल क्रावली (अमेरीका) ज्ञानेश्वर मुळे, जर्मी केल्म (अमेरीका), हिरालाल पगडाल, केतकी भिसे (लंडन) हे संवाद साधणार आहे.
ही ग्लोबल कॉन्फरन्स सर्व देशांमध्ये उपलब्ध होणार असून जय हिंद च्या https:// www.facebook.com <http://www.facebook.com> / jaihindpeoplesmovement/ या फेसबुक पेज व सर्व सोशल माध्यमांवर उपलब्ध असणार आहे.
तरी आंतरराष्ट्रीय तंज्ञाचा सहभाग असलेले या प्रथम ग्लोबल कॉन्फरन्समध्ये अधिकाधिक तरुणांनी व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे अवाहन जयहिंद लोकचळवळीचे समन्वयक संदीप खताळ, आंतरराष्ट्रीय समन्वयक अशोक खैरनार व आंतरराष्ट्रीय समन्वयक सुरज गवांदे व जयाहिंद लोकचळवळ सर्व विभागांच्या वतीने करण्यात आले आहे.