◻ लग्नास नकार देऊन केली होती अर्थिक फसवणूक ; चौघा विरुध्द गुन्हा दाखल.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथील २६ वर्षीय तरुणीला तिच्या होणाऱ्या पतीने अपशकून म्हणून हिनावत साखरपुडा झाल्यानतंर लग्नास नकार दिला होता. त्यामुळे या तरुणीने पाण्याने भरलेल्या विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली होती. यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात चार जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
आश्वी पोलिस ठाण्यात किरण सांगळे यांनी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, गुरुवार दि. ५ नोव्हेबर २०२० रोजी सकाळी हंगेवाडी शिवारात पांडुरंग सांगळे यांच्या शेतातील विहीर मध्ये भारती भास्कर सांगळे ही मुलगी मृतावस्थेत आढळूून आली. मयत भारती सांगळे हिचा मुंबई येथील सागर अर्जुन सानप यांच्या बरोबर विवाह ठरला होता. त्यांचा दि. ३० जून २०२० रोजी साखरपुडा ही झाला होता. मुलीच्या घरच्यांनी मुलाकडील घरच्यांना एक तोळे सोन्याची अंगठी व दोन लाख रुपये रोख विश्वासाने दिले होते. तर मुलाकडच्यानी मयत भारती हिस दोन तोळे सोन्याचे नेकलेस व कानातील दागिने दिले होते.
साखरपुडयानंतर सागर सानप याने मुुलीच्या घरच्याशी चांगले संबंध ठेवून त्यांचा विश्वास संपादन केला. सागर याने साखरपुड्यात दिलेले दागिने व्यवस्थित करून आणतो असे सांगून घेऊन गेला. त्यानंतर दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सागर यांने मयत भारती हिस फोन केला व तुझ्या घरचे आमच्यासाठी अपशकून असल्याचा आरोप करुन ठरलेला विवाह मोडल्याचा सागितले. तर साखरपुड्यात दिलेले दागिने व रोख रक्कमेस ना कबूल गेले. तसेच मयत व कुटुंबीयास शिवीगाळ करून पुन्हा आमच्याशी संपर्क करू नका असे म्हणत मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे मयत भारती हीने विहिरीमध्ये आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात सागर सानप, अर्जुन सानप, सुजाता सानप, स्नेहा आव्हाड (सर्व रा. नेहरु नगर, कुर्ला इस्ट, मुंबई) या ४ जणावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, सोन्याचे दागिने व पैशाचा अपहार केल्याबद्दल गुन्हा रजी. नं ४३१/२०२० प्रमाणे भादंवी कलम ३०६, ४०६, ५०४/३४ नुसार गन्हा दाखल केला आहे. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करत आहेत.