संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल गायकवाड कुटुंबीयांनी मातोश्री दिवगंत भगिरथी हणमंता गायकवाड यांच्या अस्थिचे रक्षा विसर्जन करण्याऐवजी वृक्षारोपणाद्वारे आईच्या आठवणी जतन केल्या असून जुन्या रुढी - परंपरेला फाटा देत गायकवाड कुटुंबीयानी पर्यावरणपूरक निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींसह आश्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थानी स्वागत केले आहे.
आश्वी खुर्द येथील सेंद्रीय शेती, भुमाता आणि गोमाता यांवर शेतकऱ्यांना प्रबोधन करणारे कृषितज्ञ तसेच पर्यारणांचे अभ्यासक म्हणून परिचित असलेले डाॅ. भास्कंर गायकवाड व प्रयोगशिल शेतकरी लक्ष्मण गायकवाड यांच्या मातोश्री सौ. भगिरथी हणमंता गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले. गोमाता आणि भुमातेची सेवा करुन अादर्श संस्कार करुन गोरगरिब जनतेला आधार देणाऱ्या आईची रक्षा कोठेही विसर्जित न करता, पर्यावरण दूषित करण्याऐवजी वृक्षरोपण करुन पर्यावरण समृद्धीच्या आठवणी जतन करण्याचा निर्णय या दोन शेतकरी पुत्रांनी घेऊन, नवा पायंडा घालत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
याप्रसंगी प्रगतशील शेतकरी हणंमता गायकवाड, प्रवरा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी लक्ष्मण गायकवाड, कृषी विज्ञान केद्रं बाभळेश्वर चे मा. प्रमुख शास्रज्ञ भास्कंर गायकवाड, पायरन्सचे एम. एम. पुलाटे तसेच सपुर्ण गायकवाड व पुलाटे परिवार उपस्थित होता. दरम्यान गायकवाड कुटुंबाने उचलेल्या स्तुत्य पावलाचं आश्वीसह पंचक्रोशीत कौतुक होत आहे. गायकवाड भावंडांनी घालून दिलेल्या आदर्शावर इतरांनीही चाललं पाहिजे, किंबहुना ती काळाजी गरज असल्याची भावना गावकऱ्यांनी बोलून दाखवली.
काय आहे प्रथा आणि परंपरा..
माणसाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार पार पाडून अस्थी नदीपात्रात विसर्जित करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. यामुळे मृतात्म्यास मोक्ष मिळतो, असा समज आहे. परंतु अलीकडच्या काळात नदीपात्रातील पाणी दूषित होऊ नये, या उदात्त हेतूने आई, वडील व कुटुंबातील व्यक्तीच्या अस्थी व रक्षा नदीपात्रात विसर्जित न करता शेतात पसरवून अथवा झाड लावुन विसर्जित केल्या जात आहे.