संगमनेर Live (शिर्डी) | राहाता तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पर्यत पीक पाहणी नोंदवली नाही अशा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. तेव्हा शेतकऱ्यांनी तात्काळ 'ई-पीक पाहणी' अँपद्वारे पीक पाहणी नोंदवावी. असे आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
पीक पाहणी मोबाईल द्वारे नोंदविण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ आहे. आपण पीक पाहणी न नोंदविल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. पीक पाहणी नोंदणी करताना अडचण आल्यास मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी आपल्या शेताची 'ई- पीक पाहणी' नोंदवावी. पीक पाहणी मोबाईल वरून करण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे. ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप तयार करण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवरुन आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
तरी अद्याप पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी मोबाईल वरून आपल्या शेतातील पिकाची नोंदणी केली नाही. अशा शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन ही ई- पीक पाहणी व्हर्जन २ हे अॅप डाऊनलोड करून तात्काळ ई-पीक पाहणी करण्यात यावी. असे आवाहनही तहसीलदार हिरे यांनी केले आहे.