◻️..तर मग ही भन्नाट माहिती तुमच्यासाठी
संगमनेर LIVE | सध्या दिल्ली ही आपल्या देशाची राष्ट्रीय राजधानी म्हणून ओळखली जात असली तरी, इतिहासाची जुनी पाने उलटली तर कळेल की दिल्ली ही नेहमीच राजधानी राहिलेली नाही. मागच्या काळात देशाच्या वेगवेगळ्या राजधान्या झाल्या. अनेक राज्यकर्त्यानी त्यांच्या काळात राजधानीचे अस्तित्वच बदलून टाकले.
पण तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहीत नसेल की, भारतात इंग्रजांच्या राजवटीत एकदा एका शहराला एका दिवसासाठी देशाची राजधानी बनवण्यात आली होती. केवळ एका दिवसासाठी भारताची राजधानी बनलेल्या शहराला आपण सर्व ‘प्रयागराज’ या नावाने ओळखतो. अशी भन्नाट माहिती लोकसत्ता ऑनलाईन ने दिली आहे.
लोकसत्ताने पुढे म्हटले आहे की, ब्रिटीशांच्या काळात भारतातील एक शहर हे एका दिवसासाठी देशाची राजधानी बनले होते. हे शहर उत्तर प्रदेशमध्ये आहे. सध्या आपण सर्व या शहराला प्रयागराज या नावाने ओळखतो. पण ज्या वेळी हे शहर एका दिवसासाठी भारताची राजधानी बनले होते, त्या काळात हे शहर अलाहाबाद म्हणून ओळखले जात होते. १८५८ मध्ये ब्रिटीश राजवटीत यूपीचे तत्कालीन अलाहाबाद हे एका दिवसासाठी आपल्या देशाची राजधानी बनले होते.
एका दिवसासाठी भारताची राजधानी बनण्याचे कारण काय?
वास्तविक या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीने भारताचा कारभार ब्रिटीश राजेशाहीकडे सोपविला असे म्हटले जाते. त्या काळातील अलाहाबाद ही उत्तर-पश्चिम प्रांतांचीही राजधानी होती. त्यावेळी अलाहाबाद हे ब्रिटीश सैन्याचे तळ असायचे, तिथे त्यांनी खूप काम केले. दिल्लीपूर्वी देशाची राजधानी कलकत्ता असायची. जे १९११ मध्ये इंग्रजांनी दिल्लीत हलवले होते. असे लोकसत्ताने म्हटले आहे.
***माहिती स्रोत :- लोकसत्ता ऑनलाईन