◻️ सदंस्य पदाच्या १५ जागांसाठी अपक्षासह ३३ उमेदवार रिंगणात
◻️ अपक्षाची उमेदवारी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार?
संगमनेर LIVE | शिर्डी मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील अतिशय प्रतिषठेच्या अशा आश्वी बुद्रक ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी राज्याचे महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचे गट आमने - सामने उभे ठाकले असून अटीतटीच्या दुरंगी लढतीतबरोबरचं अपक्ष उमेदवार दाखल झाल्याने सरपंच पदाची निवडणुक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याठिकाणी लोकनियुक्त सरपंच पद अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी राखीव असल्यामुळे विखे पाटील गटाकडून रविंद्र सुभाष बर्डे तर थोरात गटाकडून नामदेव किरण शिंदे याच्यांत थेट लढत होणार असून तान्हाजी रघुनाथ नांगरे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतल्यामुळे सरपंच पदाची निवडणूक रंगतदार व अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही गटाकडून सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज तर सदंस्य पदाच्या १५ जागासाठी ८६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. असे असले तरी २५ ऑक्टोबरला म्हणजे अर्ज माघारीच्या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे.
आश्वी बुद्रक ग्रामपंचायतीवर माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात गटाची सत्तां होती. त्यामुळे महसूलमंत्री ना. विखे पाटील गटाने सत्तां आपल्याकडे खेचण्यासाठी एकास एक उमेदवार मैदानात उतरवले आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीत सदंस्य पदासाठी प्रभागनिहाय अंतिम उमेदवार पुढीलप्रमाणे..
प्रभाग १ :- चांद अहमद शेख (विखे गट), शितल दिलिप बोरुडे (विखे गट), राजश्री सोमनाथ गाडेकर (विखे गट) तसेच अजरुद्दीन सिकंदर शेख (थोरात गट), जयश्री विजय केदारी (थोरात गट), अरुणा विजय हिंगे (थोरात गट), याव्यतिरिक्त प्रशांत प्रकाश कोळपकर (अपक्ष) व रमेश मधुकर धर्माधिकारी (अपक्ष)
प्रभाग २ :- भाऊसाहेब तात्यासाहेब खेमनर (विखे गट), मिना आंतोन गायकवाड (विखे गट), सारिका विशाल पाटील (विखे गट) तसेच योगेश वसंत पिलगर (थोरात गट), सुरेखा दत्तात्रय पंडित (थोरात गट), रोहिणी राजकुमार जऱ्हाड (थोरात गट)
प्रभाग ३ :- अनिल राधाकिसन कगंणकर (विखे गट), विजय काशीनाथ म्हसे (विखे गट), बिजलाबाई भास्कर मोरे (विखे गट), तसेच अंकुश काशीनाथ घोडके (थोरात गट), बाळासाहेब नानासाहेब मदने (थोरात गट), कोमल शंकर माळी (थोरात गट)
प्रभाग ४ :- गोरक्षनाथ पांडुरंग म्हसे (विखे गट), सुभाष भिकाजी चतुरे (विखे गट), पुजा राहुल राखपसरे (विखे गट), तसेच अविनाश गिताराम गायकवाड (थोरात गट), बबन भाऊराव शिंदे (थोरात गट), पुजा किसन हतांगळे (थोरात गट)
प्रभाग ५ :- वैभव एकनाथ ताजणे (विखे गट), सायली प्रमोद ताजणे (विखे गट), मिना नवप्रकाश गायकवाड (विखे गट) तसेच अभिजित शंकर ताजणे (थोरात गट), दर्शना संतोष ताजणे (थोरात गट), परिघा बाळासाहेब गायकवाड (थोरात गट), याव्यतिरिक्त दिपक उत्तम गायकवाड हे अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान होऊ घातलेल्या निवडणुकीत आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे ५ हजार ४०६ इतके मतदान आहे. या निवडणुकीत सदस्य पदासाठी ३३ तर सरपंच पदासाठी ३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याचे २५ ऑक्टोबंर रोजी म्हणजे माघारीच्या दिवशी स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे आता ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून ६ नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणी व निकाल जाहिर केला जाणार आहे. त्यामुळे पुढील १० दिवस कार्यकर्ते व उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रचार करण्याबरोबरच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणार आहेत. असे असले तरी अपक्षाची उमेदवारी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार? हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकनियुक्त सरपंच पदासाठी रविंद्र सुभाष बर्डे (विखे गट), नामदेव किरण शिंदे (थोरात गट) व तान्हाजी रघुनाथ नांगरे (अपक्ष) यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.