संगमनेर येथे पाकिस्तानी झेंडा जाळून आणि जोरदार घोषणाबाजी करून निषेध

संगमनेर Live
0
संगमनेर येथे पाकिस्तानी झेंडा जाळून आणि जोरदार घोषणाबाजी करून निषेध 

◻️ अतिरेक्यांना चांगला धडा शिकवा - सौ. नीलम खताळ

संगमनेर LIVE | जम्मू - काश्मीरमधील पहलगाम येथे पोलिसांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून एक-एकाला ठार केले. या भ्याड हल्ल्याचा संगमनेर येथील महायुतीच्या कार्यकर्त्यानी बस स्थानकासमोर जुन्या नाशिक - पुणे महामार्गावर उतरत जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला. 

यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणा देत संतप्त झालेल्या महा युतीच्या कार्यकर्त्यानी पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करत संताप व्यक्त केला. यावेळी महायुतीच्या वतीने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी शिवसेनेचे रामभाऊ राहाणे, रमेश काळे, विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे, भाजपचे गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, पायल ताजणे, रिपाइंचे कैलास कासार, शिरीष मुळे, ज्ञानेश्वर कर्पे, सुदर्श इटप, दिलीप कोल्हे, भारत गवळी, शशांक नमन आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून केलेल्या अतिरेकी हल्ल्याचा महायुतीच्या वतीने  जाहीर शब्दात निषेध व्यक्त केला आणि अतिरेक्यांना चांगला धडा शिकवावा अशी मागणी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ यांनी केंद्र सरकारकडे केली.

हिंदू पर्यटकांवर दहशत वाद्यांनी जो हल्ला केला. त्या सर्वच अतिरेकी संघटना खत्म करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलावे अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने भाजपच्या पायल ताजणे यांनी केली. 

अतिरेक्यांनी केलेल्या या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी सर्वानी राजकारण बाजूला ठेवून पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे रिपाइंचे कैलास कासार यांनी सांगितले.  

दहशतवाद्यांनी जो हल्ला केला. तो हल्ला फक्त हिंदू पर्यटकांवर झालेला नाही तर, संपूर्ण देशातील असंख्य हिंदूंवर झालेला हल्ला आहे, त्यामुळे खून का बदला, खून से देंगे' असे करून त्यांचा बदला घेतला पाहिजे. असे शिवसेनेचे विनोद सूर्यवंशी, रमेश काळे यांनी म्हटले.

पर्यटकांना दहशतवाद्यांनी ज्याप्रमाणे धर्म विचारून गोळीबार करत ठार मारले, त्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मागील वेळी 'वीट का जवाब, पत्थर से देंगे' या युक्तीप्रमाणे केलेल्या सर्जिकल स्ट्राइक पेक्षाही मोठा सर्जिकल स्ट्राइक करून हिंदू पर्यटकांवर हल्ला केला. त्यापेक्षा ही मोठा हल्ला पाकिस्तानच्या अतिरेकी तळावर करून त्यांचे तळ उध्वस्त करावे. असे भाजपचे गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे यांनी केंद्र सरकारकडे केली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !