महायुती सरकारच्या माध्यमातून प्रलंबित असलेले विकास कामे मार्गी लावणार
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते घुलेवाडी येथे सव्वादोन कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ
◻️ विकास कामे चांगल्या दर्जाची करण्यासाठी ठेकेदारांना दिल्या सुचना
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भरीव निधी आणू शकलो. या निधीतून विविध विकासकामे मार्गीलागत आहे. त्यात घुलेवाडीत सव्वा दोन कोटीची विकास कामे सुरू होत आहे. ती सर्वकामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे, याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. महायुती सरकारच्या माध्यमातून या मतदार संघातील प्रलंबित असलेली कामे मार्गी लावली जातील असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील घुलेवाडी येथे अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेतर्गत सव्वादोन कोटी रुपयांच्या विविधविकास कामांचे भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. बुद्ध विहार येथे आयोजित कार्यक्रमात आमदार अमोल खताळ बोलत होते.
आ. खताळ पुढे म्हणाले की, घुलेवाडी ही जहागीरदारी आहे, असे काही जण समजत होते. त्यांनी कधीच वंचित समाज बांधवांच्या भागाचा विकास केला नाही. निवडणुका आल्या की मगच त्यांना विकास दिसतो. इतरवेळी ते या समाज बांधवांचा फक्त निवडणुकी पुरता वापर करत असतात. दादागिरीला भीक घालू नका मी तुमच्या पाठीमागे भक्कम उभा आहे. असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की, या तालुक्यातील दहशत व दादागिरी आपण मोडून काढत त्यांचा बंदोबस्त केला आहे.
जर घुलेवाडीतील काही बगलबच्चे तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही सर्वांनी साथ दिली तर त्यांचा सुद्धा बंदोबस्त करू. या मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ न देता विकास कामांच्या माध्यमा तून घुलेवाडी नव्हे तर संपूर्ण मतदार संघातील मूलभूत प्रश्न सोडले जातील.
मात्र विकास कामे करताना ती कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुढील काळात ठेकेदारांनी कामाचा दर्जा चांगला ठेवला तरच तुम्ही या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे करू शकाल. अन्यथा तुम्ही दुसऱ्या तालुक्यामध्ये कामे शोधण्याची सोय करून घ्या अशी तंबी त्यांनी दिली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा आत्तापर्यंत सर्वांना लाभ मिळवून दिला आहे. मात्र जे काही या शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिले आहे. त्यांना ही महायुती सरकारच्या माध्यमातून लाभ दिला जाईल. राजकारण हे विकास कामासाठी केले पाहिजे. असे देखील आमदार खताळ यावेळी म्हणाले.
घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात महायुती सरकारच्या माध्यमातून सोनो ग्राफी आणि डायलेसिस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इथून मागील काळात आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होते. मात्र आपल्या नातेवाईकांचे दवाखाने चालले पाहिजे म्हणूनच त्यांनी या तालुक्यातील ना आरोग्याचा आणि ना जनतेच्या विकासाचा प्रश्न सोडू शकले. हे त्यांचे अपयश असल्याची टीका आमदार अमोल खताळ यांनी केली.