ज्ञानगंगा विद्यानिकेतन शाळेचा इयत्ता १० वी चा १०० टक्के निकाल
◻️ मांचीहिल शिक्षण संकुलातील सर्व विद्यार्थ्यानी केले दैदिप्यमान यश संपादन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेल्या मांचीहिल शैक्षणिक संकुलातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन शाळेचा इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यानी दैदिप्यमान यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
यामध्ये शाळेतील प्रतीक्षा संपत जोंधळे हिने ९५.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक, द्वितीया बाबासाहेब जाधव ९५.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, चैतन्य देवेंद्र डोंगरे ९१.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक, पायल रवी खेमनर ९०.८० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक, माहेश्वरी दिगंबर जगताप ९०.६० टक्के गुण मिळवून पांचवा क्रमांक पटकावला आहे.
त्याचबरोबर वेदांत शंकर सागर याने ९० टक्के, भाग्यश्री नंदकुमार वदक हिने ८९.६० टक्के, मितेश दिनेश शहा ८८.२० टक्के, कार्तिक राजेंद्र गाढे ८८.२० टक्के, विघ्नेश सुधाकर गायकर ८७.८० टक्के, भाग्येश नानासाहेब हाके ८७.८० टक्के, वलवे यश रामदास विवेक ८७.६० टक्के गुण मिळवून या विद्यार्थ्यानी दैदिप्यमान यश संपादन केले.
विशेषतः ज्ञानगंगा विद्यानिकेतन या शाळेत इयत्ता पहिली पासून शिकत असलेल्या सुमारे ३५ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले आहे.
दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर, संचालिका नीलिमा गुणे, प्राचार्य विजय पिसे, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, वर्गशिक्षक सुनिता गंगुले, मोहन वैराळ, आशिष जाधव आदिसह सर्व विषय शिक्षकांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान या विद्यार्थ्याना शीतल सांबरे, किसन हजारे, पद्मा ताजने, प्रदीप जगताप, अलका गोसावी, अनिल जोशी, शशिकांत गमे, विजय वर्पे, सुशील ओहोळ, सारिका खेमनर, शुभांगी गाडेकर या विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तर, वस्तीगृह प्रमुख रवींद्र बनगैया यांचे सहकार्य लाभले.