फेक नॅरेटिव्ह आणि व्होट चोरीचे आरोप करणाऱ्याना धोबीपछाड - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
फेक नॅरेटिव्ह आणि व्होट चोरीचे आरोप करणाऱ्याना धोबीपछाड - मंत्री विखे पाटील 


◻️ बिहार निवडणूकीत मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान, गृहमंत्री यांचे केले अभिनंदन 

◻️ राहूल गांधीना कॉग्रेसच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा दिला सल्ला 


संगमनेर LIVE | भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता  विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे. व्होट चोरीचे आरोप करणाऱ्याना या निवडणुकीने धोबीपछाड केले. अशी प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न पडता विकास प्रक्रीयेला साथ दिली. अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला. पंतप्रधान यांच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली. संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले. आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले. विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता परदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वःताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !